दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे


 


देवणी/प्रतानीधी


 


देवणी शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने ५ टक्के निधी राखून ठेवला आहे. तो निधी तात्काळ तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाच्यावतीने करण्यात आली असुन दिव्यांगाना न्याय न मिळाल्यास नगर पंचायत देवणी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष निळकंठ डोंगरे यांनी दिला आहे.


       देवणी शहरातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसुन कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी वणवण भटकावे लागत असुन देवणी शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या ५ टक्के निधी पासून वंचित आहे. त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. शासन व प्रशासनाने दिव्यांगकडे दुर्लक्ष आहे. केंद्र सरकार व राज्ये सरकारच्या विशेष निधीतून शहरी व ग्रामीण भागातल्या प्रत्येक दिव्यांगाच्या थेट खात्यामध्ये ५ टक्के निधी तात्काळ जमा करण्यात यावे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस मिळावा. यासाठी महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघ शाखा न्यायासाठी मैदानात उतरली असल्याचे स्पष्ट करीत संघटनेचे तालुकाध्यक्ष निळकंठ डोंगरे यापुढील काळात विविध आंदोलन करुन दिव्यांगाच्या समस्या सोडविण्याचे काम संघटना करणार असल्याचे जाहिर केले.


       देवणी शहरातील दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्यासाठी व त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी त्यांना मिळावा यासाठी आवाज उठवत असुन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र अपंग कामगार संघटनेचे निवेदन देवून दिव्यांग व्यक्तींचा राखीव निधी तात्काळ जमा न झाल्यास नगर पंचायत कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर नीलकंठ हणमंत डोंगरे, शेख साजिद इस्माईल, प्रशांत दादाराव शिंदे, प्रकाश माधव कांबळे, वत्सलाबाई बाबुराव सुर्येवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.