माजी मुख्यमंत्री तथा केद्रीय मंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून विनम्र अभिवादन

माजी मुख्यमंत्री तथा केद्रीय मंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून विनम्र अभिवादन


लातूर / प्रतिनिधी


 



 दि. २६- लातूर : महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व, राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची आज जयंती निमित्ताने राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांनी बाभळगावातील विलासबाग स्मृती स्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले.


 


यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड व्यंकट बेंद्रे, लातुर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, अॅड .प्रा.बि. व्ही मोतीपवळे सर इत्यादी उपस्थित होते.


 


यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की


 महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी अविरत प्रयत्न केले. पुरोगामी, प्रगत महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यानी मोलाचे योगदान दिले.महाराष्ट्राची सर्वसमावेशक प्रगती हे त्यांचं ध्येय होतं. त्यासाठी नियोजनबद्ध कामे केली.


 


बाभळगावच्या सरपंचपदापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या, केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडलेल्या देशमुख साहेबांनी प्रत्येक पदाला न्याय दिला. राजकारण, समाजकारण, सहकार, कला आंदिसह सर्वच क्षेत्रात त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले . स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अपार प्रेम, आदर, आपुलकी चिरंतन आहे. सर्वसामान्य जनतेशी जुळलेलं त्यांच नातं अतूट आहे.


 


कृषी, उद्योग, अर्थ, सहकार, शिक्षण, आरोग्य सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला त्यांनी पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला. राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु मनभेद असू नयेत हा विचार रुजवला , वाढवला. महाराष्ट्रात वैचारिक देवाणघेवाणीची राजकीय संस्कृती निर्माण केली.अशा या महाराष्ट्रातील महान नेत्यांस विनम्र अभिवादन..